लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.
१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित
६ टिप्पण्या:
श्री विनायक पंडित यांनी आपल्या पत्रवाचनात आणलेला प्रतिध्वनीचा इफेक्ट एकदम चपखल वातावरण निर्मिती करतो आहे. मस्तच.
दोन भिन्न आवाज वापरण्याचं तंत्र आवडलं...महाराज थेट हृदयात शिरले.
लिखाण आणि वाचन दोन्ही उत्तम..
लेखन सुंदर.
त्याला साजेशा आवाजात अभिवाचन केल्याने श्रवणीय झाले. :)
आवाजावर घेतलेली मेहनत जाणवते
सर्वांचे मन:पूर्वक आभार!
@शांतीसुधा: इथे आणि संपादकीयाखालीही नेमका प्रतिसाद दिलाय.अनेक आभार!
टिप्पणी पोस्ट करा